गौतम बुद्धांनी सांगितलेला मनःशांतीचा मार्ग
एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एका गावातून जात होते.त्यांच्या प्रवासात एका तलावासमोर ते आले. गौतम बुद्धांना तहान लागली होती म्हणून त्यांचा एक शिष्य तलावातून पाणी घेण्यासाठी गेला. मात्र तलावावर काही स्त्रिया कपडे धूत होत्या आणि त्यामुळे पाणी गढूळ झाले होते. शिष्य बुद्धांकडे परत येऊन म्हणाला की हे पाणी पिण्यायोग्य नाही. बुद्धांनी मंद स्मित केले. काही वेळानंतर त्यांनी पुन्हा शिष्याला पाणी आणायला सांगितले.यावेळी मात्र तलावातील पाणी एकदम स्वच्छ आणि नितळ झाले होते. शिष्याने लगेच पाणी भांड्यात भरले व ते गौतम बुद्धांकडे घेऊन आला.बुद्ध शिष्याकडे बघून म्हणाले की,पाणी शुद्ध करण्यासाठी तुला काहीच करावं लागलं नाही.तू पाण्याला स्थिर होऊ दिलंस आणि त्यातील गाळ आपोआपच खाली जाऊन बसला .
मित्रांनो,आपलं मनही काहीसं असच असतं. आपण अस्वस्थ असतो तेव्हा जास्त त्रास न करून घेता मन आपोआप शांत होऊ द्यावे. मनःशांती " मिळवता " येत नाही तर ती एक प्रक्रिया असते.जी आपोआपच होते.
जेव्हा आपण आतून समाधानी असतो.तेव्हा आपोआपच सर्व चिंता, कष्ट,त्रास दूर होतात. so don't worry be happy. निसर्गात प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रक्रिया असते आणि आपल्या सर्वांना त्यातून जावे लागते.आपण आपले कर्म करत राहायचे. सत्कर्म केल्याने मनःशांती मिळते.
परत भेटुच एका नवीन लेखासह.तोपर्यंत हसत राहा,आनंदी राहा.शुभं भवतु. God is always with you. प्रणाम !!!
Comments
Post a Comment